मुंबई: आज डॉ.तुषार कांती बॅनर्जी लिखीत ‘भगत सिंह कोश्यारी : ए सोल डेडीकेटेड टू द नेशन’ या पुस्तकाचे प्रकाशन दरबार हॉल, राजभवन, मुंबई येथे झाले या कार्यक्रमादरम्यान राज्यपाल बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
यावेळी राज्यपाल म्हणाले, “जेव्हापासून मी राज्यात आलोय, तेव्हापासून मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस हे देशासाठी आशेचे किरण आहेत. देवाची इच्छा असेल तर फडणवीस राज्यासोबतच देशासाठी येत्या काळात काही तरी योगदान देतील.मला वाटते फडणवीस यांनी देशाची सेवा करावी असं सूचक विधान राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांनी केले आहे.
दरम्यान, राज्यपालांनी केलेल्या या वक्तव्यामुळे फडणवीस येत्या काळात केंद्रीय पातळीवरती काम करणार की काय अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.