बीड: “पंकजाताईच पुन्हा जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून काम पहावं, पंकजाताई मागील पाच वर्ष बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री असतांना, त्यांनी जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग आणले, रेल्वे आणली, मोठे उद्योग सुरू केले. जिल्ह्याचा विकास करण्यासाठी हे महत्वाचे असते. त्यामुळे आता पुन्हा त्या बीडच्या पालकमंत्री झाल्या तर राहिलेला विकास सुद्धा पूर्ण होईल असे म्हणत प्रीतम मुंडे यांनी पंकजा मुंडेंना बीडच्या पालक मंत्री होण्याच्या शुभेच्छाही दिल्या.
त्यामुळे प्रीतम यांच्या मागणीनंतर शिंदे-फडणवीस सरकार आता पंकजा मुंडे यांना मंत्रिपद देणार का? याकडे मुंडे समर्थकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, प्रीतम मुंडे अंबाजोगाई येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.