मुंबई - केंद्रातील मोदी सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली. तपास यंत्रणांच्या शिफारसीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. याबाबतचा आदेशही जारी करण्यात आला आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “PFI ही संघटना या देशासाठी धोकादायक आहे आणि म्हणून अशा लोकांचा चोख बंदोबस्त केला पाहिजे. जे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देतात त्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे PFI वरील बंदी योग्यच आहे. तसेच घोषणा देणाऱ्यांवर कोठार कारवाई होणार असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केले.
तसेच, त्यांनी या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन करत आभार मानले आहे.