बुलढाणा:राज्यात नवीन पालकमंत्र्यांची नियुक्ती केल्यानंतर गुलाबराव पाटील पहिल्यांदाच बुलढाणा जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून आले होते. यावेळी मेहकरमध्ये गुलाबराव पाटलांच रॅली काढून जोरदार स्वागत करण्यात आलं.त्यानंतर हिंदू गर्वगर्जना कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमातून शिंदे गटात गेलेल्या खासदार प्रतापराव जाधव यांनी थेट मातोश्रीवरच गंभीर आरोप केले आहेत.
50 खोके एकदम ओके म्हणताना शंभर खोके मातोश्री ओके तेही दर महिन्याला जात असत, असं म्हणत जाधव यांनी उद्धव ठाकरेंवरच गंभीर स्वरूपाचा आरोप केला. मातोश्रीला दर महिन्याला शंभर खोके जात असल्याचा दावा, प्रतापराव जाधव यांनी केला आहे.
दरम्यान, त्यामुळे या विधानानंतर आता राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापतंय का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.