मुंबई: अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी महाविकासआघाडीतर्फे ऋतुजा लटके यांना उमेदवारा देण्यात आली आहे. BMC जॉबमुळे ऋतुजा लटके यांचा उमेद्वारी अर्जच धोक्यात आला आहे. त्यांचा नोकरीचा राजीनामा मंजूर झालेला नाही.
यावरुनच भाजपने ठाकरे गटाला अडचणीत आणणारा मुद्दा मांडला आहे. ऋतुजा लटके यांनी 2 राजीनामे का दिले? असा सवाल भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदें यांनी उपस्थित केला आहे.ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजुर न व्हावा यासाठी भाजपकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप केला जात आहे. नियमानुसार नोकरी सोडण्याआधी एक महिन्याची नोटीस द्यावी लागते. 2 सप्टेंबरला लटके यांनी जे राजीनामा पत्र दिलं त्यात त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी लागली तर असे म्हणत राजीनामा देत असल्याचा स्पष्ट उल्लेख केला नव्हता.यानंतर त्यांनी 3 ऑक्टोबरला राजीनामा पत्र दिले. तारखेनुसार एक महिन्याचा कालावधी पूर्ण होत नाही. यामुळे नियमानुसार त्यांचा राजीनामा मंजूर झालेला नाही असे दोन मुद्दे प्रभाकर शिंदे यांनी उपस्थित केले आहेत.
दरम्यान, गोंधळ निर्माण करुन ऐन वेळी दुसराच उमेदवार देण्याचा ठाकरे गटाचा प्लान आहे. ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांच्यासह बनवाबनवी सुरु असल्याचा आरोप प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.