नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन टी-२० सामन्यांची मालिका सुरु असून काल रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताचा दणदणीत विजय झाला. परंतु, तिसऱ्या सामन्यात भारताचे दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि के एल राहुल खेळणार नसल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. दोन्ही खेळाडूंना विश्रांती दिल्याने आता थेट टी-२० वर्ल्डकपमध्ये दिसणार आहेत.
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि उप कर्णधार के एल राहुलला दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना आता विराट आणि के एल राहुलला थेट २३ ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या सामन्यात पाहता येणार आहे.