नवी दिल्ली : अखेर देशात वेगवान इंटरनेट सेवेचे अधिकृत उद्धघाटन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्धघाटन केले. सध्या काही शहरांमध्येच हा प्रयोग आजपासून राबविण्यात येत आहे. आता 5G चे फायदे अधिक आहे.
भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी 5G सेवेचे महत्व अधोरेखीत केले आहे.
मुकेश अंबानी यांनी 5G चे सांगितलेले फायदे खालीप्रमाणे:
व्हिडिओ कॉलिंगचा दर्जा सुधारणा अशा साध्या फायद्यांचा यामध्ये समावेश नाही. इंटरनेटमुळे किती अमुलाग्र बदल होऊ शकतो, याचं उदाहरण त्यांनी यामाध्यमातून दिले आहे.
तसेच, लोकांना स्वस्त आणि चांगल्या दर्जाच्या शैक्षणिक सुविधा आता मिळतील. त्यांना ऑललाईन क्लासेस दरम्यान गतिमान इंटरनेटमुळे विविध विषय चांगल्यारित्या समजून घेता येतील. कुशल मनुष्यबळ घडविण्यासाठी या सेवेचा फायदा होईल. 5G च्या मदतीमुळे सर्वसामान्य लोकांना स्वस्त आणि दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्यासाठी मदत मिळेल. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोकांना याचा सर्वाधिक फायदा होईल.
5G तंत्रज्ञान हे ग्रामीण आणि शहरातील लोकांमध्ये संवादाचं माध्यम ठरेल. तो संवाद सेतू ठरणार आहे. त्यामुळे खेड्यातील आणि शहरातील अंतर कमी होईल. शेतीकडे लक्ष्य देण्यासाठी लोक या सेवेचा लिलया वापर करतील. त्यामुळे व्यापार-उद्दीम वाढेल. 5G तंत्रज्ञानामुळे भारत जगातील बुद्धीजीवी हब बनेल. ही सेवा उद्योगपती, नव उद्योगांसाठी मोठी मदत करणारी ठरेल. यामुळे नवीन रोजगार निर्मितीही होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.