मुंबई : राज्यामध्ये परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून, पावसाचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाची शक्यता आहे.
भंडारा, गोंदिया, नागपूर आणि वर्धा हे जिल्हे वगळता आज संपूर्ण राज्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.
परतीच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी मात्र चिंतेत आहेत. कारण या पावसामुळं हाताशी आलेली पिकं वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली असून शेती पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.