औरंगाबाद : मनसे नेते अमित ठाकरे यांनी सध्याच्या राजकारणावर तसेच सध्या सुरु असलेल्या राजकीय परिस्थितीबाबत वक्तव्य केले आहे. अमित ठाकरे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत, तिथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
अमित ठाकरे म्हणाले, “सध्या राजकारणाची परिस्थिती भयावय आहे. माझे वडील राजकारणात आहेत म्हणून मी राजकारणात आलो. त्यांनी संधी दिली म्हणून मी येथे आहे. अन्यथा माझ्या सारखा तरुण कधीच राजकारणात आला नसता, अशी काहीशी परिस्थिती सध्याच्या राजकारणात आहे, सध्याच्या राजकारणात कोणत्याची पक्षाची आपली भूमिका नाही. लोक सध्या राजकारणाकडे मनोरंजन म्हणून पाहत आहे. राजकारण केवळ लोकांचं मनोरंजन बनून राहू नये. मात्र अशी परिस्थिती कायम राहू नये म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना पर्याय देत आहोत आणि त्यांच्याशी संवाद साधत आहोत. लोकांना राजकारण केवळ मनोरंजन म्हणून पाहू नये तर त्यांच्यासाठी काम करणाऱ्या पक्षाकडे वळण्याचे आवाहनही अमित ठाकरे यांनी केले.