औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड जवळील सटाणा शिवारातील रेल्वेरुळावर रेल्वेरुळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत ४३ मेंढ्या, दोन गायी व एका बैलाचा चिरडून मृत्यू झाला आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, मेंढ्यांच्या कळपास चारून दुपारचे पाणी पाजण्यासाठी रेल्वे रुळाच्या दुसऱ्या बाजूस असणाऱ्या तलावात पाणी पाजून परतत असताना रूळ ओलांडताना ही घटना घडली. औरंगाबादहून जालन्याकडे जाणाऱ्या चेन्नई एक्सप्रेससमोर अचानक मेंढ्याचा कळप आल्याने हा अपघात घडला.
दरम्यान, करमाड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी येणाऱ्यांना अटकाव केला आणि आलेल्यांना बाजूला सारले. सध्यस्थितीत धडकेत रुळालगत व बाजूला फेकल्या गेलेल्या मेंढ्यांना एकत्रित करण्याचे काम करमाड पोलीस करीत आहेत.