Type Here to Get Search Results !

येत्या १५ दिवसांत २८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार ‘इतकी’ मोठी रक्कम!



मुंबई:  येत्या १५ दिवसांत शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत हे अनुदान मिळणार आहे. राज्यातील अल्पमुदत पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या २८ लाख शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे.



यासाठी बॅंकांनी दिलेल्या याद्यांची छाननी आता पूर्ण झाली आहे. आधार प्रमाणीकरणानंतर अंतिम याद्या प्रसिध्द होऊन त्याचे चावडी वाचन होईल. त्यानंतर १५ दिवसांत अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा केली जाणार आहे.




दरम्यान, २०१७-१८ ते २०१९-२० या तीन वर्षांत दोन वर्षे कर्जाची नियमित परफेड केली असल्यास त्यांना अनुदान देण्याचा निर्णय झाला. आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies