मुंबई : शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने गोठवलं असून दोन्ही गटाला शिवसेना नाव वापरता येणार नसल्याचा आदेशही दिला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, धनुष्यबाण चिन्हाबाबत मला काहीच आश्चर्य वाटत नाही. जेव्हा जेव्हा अशी धुसपुस आली, तेव्हा निवडणूक आयोगाने अशी कार्यपद्धती स्वीकारली आहे. मलाही अपेक्षा आहे की, निवडणूक आयोग अंतिम निर्णय देतील तेव्हा एकनाथ शिंदें यांनी बाजू मांडलेली वरचढ ठरेल.
तसेच, बहुतेक उद्धव ठाकरे विसरले की, नोटबंदी नंतर मोदी यांच्या नाण्यावर त्यांचे खासदार-आमदार देखील निवडून आलेत. मोदी यांचे नाणे खणखणीत आहे आणि ते कायम राहील, अशा शब्दात फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.