पुणे : काल निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले त्यामुळे यावर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत अशातच आता एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
ज्या धनुष्यबाणाच्या जोरावर अनेक सत्ता केंद्रांवर शिवसेनेनं सत्ता काबीज केली. महाराष्ट्र सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून देखील त्याचा मुख्यमंत्री झाला. दोघांच्या भांडणात वर्षानुवर्षात कमावलेली पुण्याई गोठवली गेली. मला वाटत यापेक्षा दुर्दैव प्रसंग नसावा, वाडवडिलांनी आयुष्यभर जे कमावलं होत ते मुलांनी मिनिटांमध्ये घालवलं. त्याला कोण जबाबदार आहे कोण नाही हे निवडणूक आयोगाचा निर्णय आला तर समजेल. परंतु निवडणूक चिन्ह तात्पुरता का होईना गोठवल हे अत्यंत दुःखदायक गोष्ट आहे, असे एकनाथ खडसे यांनी वक्तव्य केले.