अमरावती: सध्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. मात्र बीएमसी त्यांचा राजीनामा स्विकारत नसल्यानं त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करता येत नाहीये. त्यांनी आता या प्रकरणात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
राणे म्हणाले, “उद्धव ठाकरे यांना खरच ऋतुजा लटके यांना उमेदवारी द्यायची आहे की? त्यांच्या जागी दुसरा एखादा उमेदवार उभा करून त्यांच्या सहानुभूतीचा फायदा घ्यायला आहे? हे आधी उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करावं असे नितेश राणे यांनी वक्तव्य केले आहे.
तसेच, उद्धव ठाकरे यांना जर लटके कुटुंबाविषयी एवढीच सहानभुती होती तर त्यांनी स्पष्ट करावं की ते रमेश लटके यांना कितीवेळा भेटले. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री, आणि पक्षप्रमुख झाल्यानंतर त्यांनी रमेश लटके यांना वेळ दिला का? त्यांना किती वेळ मातोश्रीबाहेर उभे राहावे लागेल असा खोचक सवाल देखील नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.
दरम्यान, यावेळी ते अमरावतीमध्ये बोलते होते.