मुंबई : शिवसेनेचे दोन दसरा मेळावे काल पार पडले. काल एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरु असताना लोक उठून जात असल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. यावर शिंदेच्या सभेतून लोक उठून गेली यात भाजपचा हात आहे, असे विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वक्तव्य केले.
दानवे म्हणाले, “कालचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण स्क्रिप्ट होती. खाली बघून बघून त्यांची मान दुखली असेल. एकनाथ शिंदेच्या सभेतून लोक उठून गेली यात भाजपचा हात आहे. कारण त्यांना भाजपने दीड तासाचे रटाळ भाषण लिहून दिले, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला.