मुंबई : मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या बीकेसीतील दसरा मेळाव्यावरुन गंभीर आरोप केला आहे.
त्यावेळी त्या म्हणाल्या, “त्या विद्यापीठात दारुच्या बाटल्या, नको नको ते… जे दिसायला नाही पाहिजे, जे डिसॉल्व्ह होणं अति गरजेचं आहे, ते सगळं तिथे पडलेलं होतं. मी महिला आहे, मी ते शब्द वापरु इच्छित नाही. नको ती वस्तू ती पण तिथे पडली होती.‘ती’ पण सोय तिथे केली होती का? आणि जर केली होती, तर त्यावर कडक कारवाई तुम्ही करा! कारण दारुच्या बाटल्या बरोबर बाकीपण जे लागतं ‘ते’ पण तिथं होतं. ते होतं तर ‘ते’ दुसरंही होतं, असं भासवलं जातंय त्या कचऱ्यावरुन. त्या कचऱ्याला बघून आयोजकांवर कारवाई करणार की नाही? कारवाई केली पाहिजे, असं आमचंही मत आहे. तो मेळावा जर विचारांचा होता, तर त्या मेळाव्यात ही गल्लत कशी झाली?, असे वक्तव्य किशोरी पेडणेकरांनी केले आहे.
दरम्यान, मुंबईत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत किशोरी पेडणेकर बोलत होत्या.