Type Here to Get Search Results !

उद्धव ठाकरेंचे निवडणूक आयोगाला पत्र: पत्राद्वारे 'हि' नाराजी व्यक्त!



मुंबई:  शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला चार पानांचं खरमरीत पत्र लिहीलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी निवडणूक कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. 



सर्वोच्च न्यायालयातील वकील अॅडव्होकेट विवेक सिंह यांनी उद्धव ठाकरेंच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाला हे चार पानांचे पत्र लिहीले आहे. या पत्रात उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून एकूण १२ मुद्दे मांडण्यात आले आहेत. या पत्रात म्हटले गेले आहे की, केंद्रीय निवडणूक आयोग आमच्या पक्षाला (ठाकरे गटाला) सापत्य वागणूक देत आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आमच्या पक्षासोबत भेदभाव करीत आहे. केंद्रीय निवडणूक आयोग प्रतिवादी एकनाथ शिंदे गटाला प्राधान्य देत आहे. शिंदे गट निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर देखील कागदपत्र देत नाही. मात्र, आम्ही दिलेली कागदपत्रं शिंदे गटाला दिली जातात आणि पण त्यांची कागदपत्रे आम्हाला दिली जात नाही, त्याचप्रमाणे जो पक्ष निवडणूक लढवीत नाही तरी पण त्याच्यासाठी आमच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह रद्द केले जाते असा या पत्रात उल्लेख केला आहे.



दरम्यान, या पत्राद्वारे उद्धव ठाकरे यांनी निवडणूक कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. 




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies