मुंबई: मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाननंतर अखेर मुंबई महापालिकेने शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा स्वीकारला. दरम्यान, राजीनामा स्वीकारल्यानंतर ऋतुजा लटके यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
लटके म्हणाल्या, “आता महापालिकेने मला माझा राजीनामा मंजूर केल्याचं पत्र दिलेले आहे. याबद्दल मी महापालिकेच्या जीएडी विभागाचे आभार मानते. जशी कोर्टाची ऑर्डर होती तसं त्यांनी मला सहकार्य केलं. याबाबत मी त्यांचे आभार मानते'. तसेच,'राजीनाम्यासाठी मला संघर्ष करावा लागला, माझी अजिबात इच्छाही नव्हती आणि मला कधी असं वाटलंही नव्हतं, असा संघर्ष करावा लागेल. आज मी एक लिपीक आहे आणि लिपीकाच्या राजीनाम्याकरिता एवढ्या मोठ्या गोष्टी आपल्याला आयुक्तांकडे न्याव्या लागतात. याचचं मला जरा जास्त आश्चर्य वाटतं', अशी ऋतुजा लटके यांनी प्रतिक्रिया दिली.