Type Here to Get Search Results !

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील ४८ तास धोक्याचे; मुसळधार पावसाचा हवामान विभागाकडून इशारा!



मुंबई: राज्यातील विविध भागात पुढील दोन ते तीन मुसळधार पाऊस सुरू राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. तसेच,  राज्यासाठी पुढील ४८ तास धोक्याचे असल्याचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.



हवामान खात्याच्या माहितीनुसार, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.



दरम्यान, आज म्हणजेच ८ ऑक्टोबर रोजी मुंबईत हवामान विभागाने यलो अलर्ट देखील जारी केला आहे. याशिवाय ११ आणि १२ ऑक्टोबर रोजी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies