Type Here to Get Search Results !

“रमेश लटके यांना किती मानसिक त्रास झाला हे त्यांनी मला स्वत: सांगितलं, त्यांचे फोन मातोश्रीवर उचलण्यात येत नव्हते”!



मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या राजकीय घडामोडी पहाता अंधेरी पूर्व विधानसभेची निवडणूक ठाकरे गट, शिंदे गट तसेच भाजपासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे.



राणे म्हणाले, “उद्धव ठाकरेंना स्वत:चा पक्ष वाचवता आला नाही, चिन्ह वाचवता आलं नाही. वडिलांच्या आजारावेळी आदित्य ठाकरे बाहेरगावी पार्ट्या करत होते. एकदा प्रवासादरम्यान स्वत: रमेश लटके यांनी मला त्यांना किती मानसिक त्रास सुरू आहे हे सांगितलं. त्यांचे फोन मातोश्रीवर उचलण्यात येत नव्हते, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. 



दरम्यान, या सर्व गोष्टी बाहेर निघाल्यानंतर सहानुभूती कोणाला मिळते ते पाहू असेही नितेश राणे यांनी यावेळी वक्तव्य केले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies