Type Here to Get Search Results !

“भाजपने फक्त ‘या’ तीन लोकांना रोजगार दिला”: ‘यांची’ टीका!



पुणे: पुण्यात शिवसेना प्रवक्त्या निलम गोऱ्हे आज पत्रकार परिषद होती. यावेळी त्यांनी  भाजप नेत्यांवर थेट नवे घेत टीका केली आहे.



त्या म्हणाल्या, “उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची प्रतिमाभंजन करण्याचे षडयंत्रं केले जात आहे. वेदांतावरून आदित्य ठाकरेंवर टीका केली जात आहे. त्याशिवाय मुंबईतील दोन्ही दसरा मेळाव्याची तुलना केली जात आहे. मात्र, आमचा पारंपारिक मेळावा आहे. आमचा मेळावा वाजतगाजत होईल. आमची शक्ती दिसेल. अद्भूत असा मेळावा होणार आहे, असं सांगतानाच भाजपने फक्त तीन लोकांना रोजगार दिला. एक नवनीत राणा, किरीट सोमय्या, आणि नारायण राणे या तिघांनाचा भाजपने रोजगार दिला आहे, अशी टीका शिवसेना प्रवक्त्या निलम गोऱ्हे यांनी केली आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies