उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशचे एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शौकत अली यांनी हिंदू विवाह पद्धतीवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
शौकत अली म्हणाले, “आम्ही तीन-तीन विवाह करतो असे लोक म्हणतात. आम्ही दोन लग्ने करतो, पण आमच्या पत्नींचा आदर करतो. मात्र, तुम्ही (हिंदू) एकीशी लग्न करता आणि तीन-तीन प्रेयसी असतात. तुम्ही ना पत्नीचा, ना प्रेयसींचा आदर करता, असं शौकत अली म्हणाले.
हिजाब वादावरही शौकत अली यांनी भाष्य केले. या देशात कोण काय परिधान करेल, हे संविधान ठरवेल. तसेच, शीख समाजातील व्यक्ती पगडी परिधान करू शकते, एक हिंदू महिला मंगळसूत्र आणि कुंकू लावू शकते, तर मुस्लीम मुलींना हिजाब परिधान करण्यापासून का रोखले जाते, असा सवाल त्यांनी केला होता.