Type Here to Get Search Results !

'उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला, तो महाराष्ट्र विसरला नाही’!




मुंबई: शिवसेनेच्या शिंदे गटाने बीकेसी मैदानावर भवदिव्य दसरा मेळाव्याचे आयोजन केले. या दसरा मेळाव्यातून शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. 



शहाजीबापू पाटील म्हणाले,' बीकेसी मैदानातील भगवं वादळ बघितलं, तर महराष्ट्रात खरी शिवसेना कोणाची हे कळेल. 'उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला, तो महाराष्ट्र विसरला नाही. बाळासाहेब ठाकरे हे मैद्याचं पोतं, बारामतीच्या ममद्या कोणाले म्हणाले ? विलायती महिला मला चालणार ? कोण म्हणाले ? रक्ताने वारसदार असल्याने तुम्हाला बोलायचा अधिकार आहे. तुमचा द्वेष करणार नाही. पण तुम्हा आम्हाला फरफटत आम्हाला राष्ट्रवादीकडे नेले. एकनाथ शिंदे यांनी धाडसाने हे पाऊल उचलले. आमच्या नेत्यांच्या मेळाव्यात लाखो माणसे आली, असे त्यांनी वक्तव्य केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies