मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेला आपलं म्हणणं मांडण्यासाठी ७ ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. त्यामुळे आपलं म्हणणं मांडण्यासाठी आता ठाकरे गटाला मुदत मिळाली आहे.
दरम्यान. २३ सप्टेंबरला ठाकरे गटाने आपले म्हणणे मांडण्यासाठी निवडणूक आयोगाकडे वेळ वाढवून मागितली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने शिवसेनेची ही मागणी मान्य करत ७ ऑक्टोबरपर्यंत वेळ वाढवून दिली आहे. त्यामुळे शिवसेनेला आपलं म्हणणं ७ ऑक्टोबरपर्यंत मांडावं लागणार आहे.