रत्नागिरी : निलेश राणे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर टीका केली आहे.
राणे म्हणाले, “भास्कर जाधव कार्टूनच आहे. आम्ही त्यांना बैल म्हणतो. तळ कोकणात त्यांना बिनकामाचा बैल म्हणतात. येत्या सोमवारी चिपळूण मध्ये सभा घेऊन भास्कर जाधव यांची पोलखोल करणार.
तसेच, राष्ट्रवादी पक्षांना इतरांवर काही काम सोडलं आहेत का? कोण खुश कोण ना खुश यावर राष्ट्रवादीचे लक्ष आहे का? राष्ट्रवादी काँग्रेस बेरोजगार झाली का? सतत सरकारच्या कामावर बोलणं योग्य नाही. शिंदे-फडणवीस सरकार चांगलं काम करतंय.जयंत पाटील काहीही बोलत असतात. हवेत गोळीबार करत असतात, याशिवाय, राष्ट्रवादीवाले अख्खा दिवस भाजपमध्ये काय चाललंय हेच बघत असतात,असे राणे यांनी वक्तव्य केले.