भंडारा : मुंबई येथे बीकेसी मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यााच्या् सभेत कॉंग्रेसवर जबर टिका केली. तर उद्भव ठाकरे यांच्या मेळाव्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे कार्यकर्ते असल्याच्या व राहुल गांधी यांच्या भारत जोड़ो यात्रेत ठाकरे समर्थकाचा भरना असल्याच्या आरोप शिंदे यांनी केला होता. त्यावर नाना पटोले यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
दोन शाहिर रात्रभर भांडुन लोकांचे मनोरंजन कसे करतात तसे दसरा मेळावे झाले आहेत. तर एकनाथ शिंदे यांनी केलेले कॉंग्रेसवरील आरोप तेही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीने हास्यास्पद आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोड़ो यात्रेला भेटलेला प्रतिसाद लक्षात घेता हा केंद्रातील मोदी सरकारचा अंतिम क्षण असून हे सरकार जाणार आहे. त्यामुळे किती कोणाला पद वाटायचे वाटून घ्या; असा खोचक टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.