औरंगाबाद : शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर राजकीय वर्तुळातून जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच आता शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आपली प्रतिक्रिया देत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
“चिन्ह गोठवण्याचं हे सगळं कारस्थान देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यांनी कट रचला आणि चिन्ह गोठवलं, त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रातून भाजप संपून जाईल”, तसेच आनंद दिघेसाहेब असते तर एकनाथ शिंदेंना उलटं टांगलं असतं, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली.