मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष चिन्हाबाबत काल मोठा निर्णय दिला. आयोगाच्या याच निर्णयावर आता आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी देखील पप्रतिक्रिया दिली आहे.
पवार म्हणाले, हे होणार याची मला खात्री होती, असं काही घडेल असं माझं मन सांगत होतं. तसेच योग्य निर्णय दिले जातील याची खात्री नाही तर आपण देखील अनेकवेळा अनेक चिन्हांवरती निवडणुका लढविल्या आहेत. चिन्हाचा काही फरक पडत नाही, शेवटी जनता सर्व काही ठरवते असंही ते म्हणाले. तसंच या सर्व परिस्थित आता शिवसेनेने निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे असे पवार यांनी वक्तव्य केले.