मुंबई : आज दसरा मेळाव्याच्या निमित्तान ठाकरे गट आणि शिंदे गटाची तोफ धडाडली.याच मेळाव्यात आमदार शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
“महाराष्ट्राची खरी शिवसेना कुणाची, याचा दाखला आता द्यावा लागणार आहे. उद्धव ठाकरेंना सांगा इकडे या आणि ही गर्दी बघा. त्यानंतर ठरवा ही शिवसेना कुणाची आहे, राष्ट्रवादीने गेल्या अडीच वर्षात आम्हाल उकीरड्यावर फेकलं. हे पाप उद्धव साहेब तुम्ही केलं. हे पाप धुवण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. एकनाथ शिंदे जिंदाबाद, एकनाथ शिंदे आगे बढो, हम तुम्हारे साथ है, तळागाळातील कार्यकर्त्यांचा हुंकार आहे, असे वक्तव्य आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले.