Type Here to Get Search Results !

शिवतीर्थावरील कालचं भाषण नव्हे तर नळावरची भांडणं आणि...: ‘यांची’ जहरी टीका!




मुंबईः शिवाजी पार्कवरील कालचं भाषण आणि एकूणच शिवसेना नेत्यांचे आरोप प्रत्यारोप ही भाषणं नव्हती तर नळावरचे भांडण होते. शिवतीर्थावरील हे भांडण अवघ्या राज्यानं पाहिलं, शिवतीर्थावर विचारांचं सोनं लुटायला मिळेल, असं लोकांना वाटलं होतं. मात्र नळावरची भांडणं आणि उणीदुणी …. माझी बादली मागे, तुझी बादली पुढे का आली, या लेवलचा दसरा मेळावा होता, असे वक्तव्य करत संदीप देशपांडे यांनी शिवसेनेच्या अंतर्गत वादांवर टीका केली आहे.



उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याचा उपयोग एकमेकांना शिव्या घालण्यासाठी केला. यात नवे कोणतेही मुद्दे नव्हते, महापालिका निवडणुका जवळ आल्यात. त्या दृष्टीने काहीही घोषणा झाल्या नाहीत. गद्दार, खंजीर, खोके याव्यतिरिक्त मेळाव्यात काहीच नव्हतं. गेली 7-8 वर्ष भाजप कसा वाईट आहे आणि त्यांना शिव्या घालण्यात गेली. आणि आता नवीन टार्गेट मिळालंय. ते 40 आमदार आणि त्यांचेच लोकं. त्यांना शिव्या घालण्यात जातात. असे वक्तव्य संदीप देशपांडे यांनी केले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies