मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठविल्याच्या निर्णयानंतर पक्षात नाराजी पसरली आहे.त्यानंतर आज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात ठाकरे गटाची दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उद्या सकाळी याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, 'निवडणूक आयोगाने आमचं म्हणणं ऐकूण न घेता निर्णय घेतला, असा दावा ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात केला आहे.