पुणे: शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवल्याच्या प्रकरणावर सुप्रिया सुळे बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, या अगोदर अशी घटना झालेल्या आहेत, उद्धव ठाकरेंसाठी अनेक कटकरस्थान करण्यात आली आहेत. मात्र, असं काही केल्याने पक्ष संपत नसतात उलट मला शिंदे गटाची काळजी वाटते असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला. तसंच राष्ट्रवादी पक्षाला देखील 2019 ला संपलं असं म्हणत होते,पण असे पक्ष संपत नसतात. देवेंद्र फडणवीस बोलतात ते सर्व खरं नसतं. पक्ष बदलल्यावर असं बोललं जातं, राष्ट्रवादीवर आरोप केले जात आहेत. शिवाय उपमुख्यमंत्र्यांनाच विचारा मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचे आहेत. तर मुंबई निवडणूक आता कमळावर लढवली जाईल अशी शक्यता देखील सुळे यांनी यावेळी व्यक्त केली.