माणदेश एक्सप्रेस न्युज
सोलापूर : आजारी असणाऱ्या मित्रासाठी, विमान बोलावले तर विशेष काय? कोणतेही दिव्य पार करू, पण मित्राचा जीव वाचला पाहिजे अशी भूमिका घेत आजारी मित्रासाठी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रय नरसाळे हे आजारी असल्याने त्यांना मुंबई येथील ग्लोबल हॉस्पिटल येथे उपचारांसाठी विमान ॲम्बुलन्सने हलवण्यात आले.
विठ्ठल साखर कारखान्याचे संचालक नरसाळे यांना चार पाच दिवसापासून पोटदुखी चा त्रास जाणवत होता. पंढरपुर येथील हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर त्यांना सोलापूर येथील आश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पुढील उपचारासाठी त्यांना ॲम्बुलन्स विमानाने मुंबई येथील हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मित्रासाठी, विमान बोलावले तर विशेष काय? कोणतेही दिव्य पार करू.. पण मित्राचा जीव वाचला पाहिजे.. त्याला स्वास्थ्य लाभलेच पाहिजे..
— Abhijeet Patil (@patil_abhijeet1) February 27, 2023
. pic.twitter.com/BCNHkx58pD