माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : टेंभुच्या बंदिस्त पाईपलाईनच्या आराखड्यात तांत्रिक कारणामुळे वंचित राहिलेल्या आटपाडी तालुक्यात माडगुळे येथील शेतकऱ्यांना आमदार अनिलराव बाबर (Anilbhau Babar) , जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील (Tanajirao Patil) यांच्यामुळे दिलासा मिळाला. सांगोला तालुक्याच्या हद्दीपर्यंत असलेल्या माडगुळेतील (Madgule) शेतकऱ्यांना पाणी देण्याचा मार्ग यानिमित्ताने निकाली निघाला. त्यामळे पाणीदार आमदार म्हणून अनिलभाऊ आणि अध्यक्ष तानाजीराव पाटील हे जनतेसाठी अविरत वेळ देणारे एकमेव नेते ठरले आहेत.
आटपाडी तालुक्यात सध्या टेंभु (Tembhu) योजनेच्या बंदिस्त पाईपलाईनचे कामकाज आहे. मुख्य सुरू पाईपलाईननंतर आत्ता वितरण व्यवस्थेचे काम विविध भागात सुरू आहे. परंतु माडगुळे गावातील चिंध्यापीर परिसर आणि सांगोला तालुक्याच्या हद्दीत असलेल्या शेतकऱ्यांचे क्षेत्र मात्र तांत्रिक कारणामुळे पाईपलाईनपासुन वंचित होते.
ही समस्या तेथील शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्याकडे मांडली. त्यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार अनिलराव बाबर यांच्याकडे मांडुन तो निकाली काढण्याची मागणी केली. आमदार अनिलराव बाबर यांनी टेंभुच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधुन माडगुळे, चिंध्यापीर व परिसरातील शेतकऱ्यांवरील अन्याय दुर करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याच्या सुचना केल्या. त्या अनुषंगाने ही समस्या निकाली काढत चिंध्यापीर, माडगुळे येथील शेतकऱ्यांसाठीचे प्रत्यक्ष पाईपलाईनचे कामही सुरू झाले. त्यामुळे वंचित असलेल्या माडगुळे, चिंध्यापीर व सांगोला तालुक्याच्या हद्दीत असलेल्या आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
आटपाडी तालुक्यातील जनतेसाठी वेळ देवून प्रश्न सोडवणे याला कर्तव्य मानून आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या नेतृत्वखाली तानाजीराव पाटील अध्यक्ष हे काम करत आहेत. वंचित भागाला पाणी देण्याच्या पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख साहेबराव पाटील, राजेश नांगरे, बबन पवार, सतिश विभुते, यशवंत खळगे, वसंत विभुते, किशोर जावीर, निशांत विभुते, अनिल विभुते, सचिन कुंभार, मुस्तफा इनामदार, तुषार विभुते, सुभाष विभुते, सुनिल लिंगडे, अरूण विभुते, अजित पाटील, सुनिल विभुते, प्रदिप पुजारी, अतुल विभुते, प्रमोद विभुते, विजय खळगे, सौरभ विभुते आदिंच्या उपस्थितीत झाला.
या कामाबद्दल आनंद व्यक्त करत या परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार अनिलभाऊ बाबर, तानाजीराव पाटील यांनी शेतीच्या समृध्दीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल समाधान मानले. टेंभू पासून वंचित कोणी राहू नये म्हणून आमदार अनिल्भाऊ, अध्यक्ष काम करत असून माडगुळे गावाला त्यांनी दिलेला दिलासा कौतुकास्पद ठरला आहे.