Type Here to Get Search Results !

सुक्ष्म माणसावर, मोठी जबाबदारी : उद्धव ठाकरेंची नारायण राणेंवर टीका



सुक्ष्म माणसावर, मोठी जबाबदारी : उद्धव ठाकरेंची नारायण राणेंवर टीका

माणदेश एक्सप्रेस न्युज 

महाड : उद्धव ठाकरे यांची महाडमध्ये सभा पार पडली. या सभेत काँग्रेसमधून आलेल्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी हातात शिवबंधन बांधलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. 


काँग्रेस तुम्हाला रोज किती शिव्या देते, त्या तुम्ही मोजता. पण, भोक पडलेली तिनपाट लोक, हे रोज माझ्यावर बोलत आहेत. विनायक राऊत सांगत होते, आमच्याकडं एक आणि त्यावर दोन फ्री असणाऱ्यांची एवढी पंचायत झाली की, त्यांना काय सांभाळावे कळत नाही. दोन पोर सांभाळायला गेलं, तर डोक्यावरी टोप खाली पडते. टोप सांभाळायला गेलं, तर पोर सुटतात,” अशी खिल्ली उद्धव ठाकरेंनी राणेंची अप्रत्यक्षपणे उडवली आहे. त्यामुळे सुक्ष्म माणसावर मोठी जबाबदारी आली आहे. रोज वाट्टेल ते बोलतात. कारण, त्यावर त्याचं पोट चालते,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.


उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं म्हणून शिवसेनून बाहेर पडलो, अशी बोंब ठोकली जाते. पण, काय हिंदुत्व सोडलं? मी तर प्रत्येक सभेत विचारतो. एक गोष्ट सांगा मी हिंदुत्व सोडल्याची? हिंदुत्व काय आहे, हे समजून घ्या, आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाही. अनेकदा बाळासाहेबांनी सांगितलंय, ‘मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय, मला अतिरेकी आणि देशद्रोह्यांना बडवणारा हिंदू पाहिजे,’” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies