सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर ऐच्छिक : डॉ. राजा दयानिधी
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना-१९ अखेरच्या टप्प्यात असून सध्या आपत्कालीन परिस्थिती नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शासकीय, निमशासकीय अधिकारी-कर्मचारी यांना तसेच गर्दीच्या व सार्वजनिक ठिकाणी (आठवडे बाजार, एस.टी स्टॅण्ड परिसर, यात्रा, मेळावे, लग्न समारंभ, मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येण्याच्या ठिकाणी) ठिकाणी मास्कचा वापर करणे ऐच्छिक राहील, असे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
यापूर्वी कोविड -१९ या आजाराचा पार्श्वभूमीवर खबरादारीचा उपाय म्हणून शासकीय/निमशासकीय कार्यालये, बॅंका, शाळा, महाविद्यालये इ.मधील सर्व शासकीय विभागातील अधिकारी/कर्मचारी यांना मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला होता व गर्दीच्या ठिकाणी व सार्वजनिक ठिकाणी (आठवडे बाजार, एस.टी स्टॅण्ड परिसर, यात्रा, मेळावे, लग्न समारंभ, मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येण्याची ठिकाणी) इ.ठिकाणी सर्व नागरिकांनी स्वंयस्फूर्तीने मास्कचा वापर करणेबाबत सूचित करण्यात आले होते.