मुंबई : राज्यासह देशातील राजकारणात शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवृत्तीवरून जोरदार चर्चा सुरू असून याबाबत आज शरद पवार खरंच अध्यक्षपदावरून निवृत्त होणार की नाही हे समजणार आहे. यावरच राष्ट्रवादीचे अनेक नेते प्रतिक्रिया देत असून खासदार अमोल कोल्हे यांनी सूचक वक्तव्य केले असून शरद पवार यांच्या भावनांचा देखील विचार केला पाहिजे असे वक्तव्य कोल्हे केले असून, पूर्ण विचारांती शरद पवार हे निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
अमोल कोल्हे म्हणाले, शरद पवार हे राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार आहेत की नाही यावर बोलणं योग्य नाही. गेली सहा दशके झालं महाराष्ट्रातील राजकारण शरद पवार यांच्या भोवती फिरत आहे. एक कार्यकर्ता म्हणून शरद पवार यांच्या भावना आपण समजून घेतल्या पाहिजेत असं मला वाटतं.
ते पुढे ते म्हणाले, “महाराष्ट्रातील राजकारण हे शरद पवार आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भोवती अनेक दशके फिरत असल्याचे आपल्या पिढीने पाहिले. शरद पवार यांनी जो निर्णय घेतला आहे हे बघता, दिल की सुने या दिमाग की असा पेच निर्माण झाला आहे. शरद पवार हे पूर्ण विचारांती निर्णय घेतील, असा विश्वास कोल्हे यांनी व्यक्त केला.