नवी दिल्ली : देशात नव्या कोरोना बाधितांची, मृतांची संख्या जरी कमी होत असली तरी अजूनही रुग्णवाढ होत आहेच. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत ६० हजार ७५३ नव्या बाधितांची नोंद झाली. तर गेल्या २४ तासांमध्ये देशातले ९७ हजार ७४३ रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे.
देशात गेल्या २४ तासांत १,६४७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे आत्तापर्यंतचा कोरोनामृत्यूंचा आकडा आता तीन लाख ८५ हजार १३७ वर पोहोचला आहे.