Type Here to Get Search Results !

भयानक : पतीला फसवून विवाहिता गेली भाच्याला घेऊन पळून; नाराज झालेल्या पतीने 3 मुलांना दिलं विष अन स्वतःही उचललं टोकच पाऊल



उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये एका महिलेने आपल्या पतीची फसवणूक करून भाच्यासोबत प्रेमसंबंध ठेवले होते. इतकंच नाही तर ती तिन्ही मुलं आणि पतीला सोडून भाच्यासोबत मुंबईला पळून गेली. हा प्रकार पतीला समजताच तो अस्वस्थ झाला. त्याने आपल्या मुलांना विषारी बिस्किटे खाऊ घातली. त्यानंतर त्याने स्वतः विष प्राशन केलं. यामध्ये पतीचा मृत्यू झाला आहे.


हे प्रकरण राणीपूर परिसरातील निजामपूर गावचे आहे. व्यवसायाने मजूर असलेले धर्म चंद पत्नी आणि तीन मुलांसह येथे राहत होता. मजुरीच्या कामासाठी तो अनेकदा घराबाहेर असायचा. याच दरम्यान, धर्म चंद याच्या पत्नीचे तिच्या भाच्यासोबत प्रेमसंबंध सुरू झाले. त्यानंतर पंधरा दिवसांपूर्वी ती आपल्या तीन निरागस मुलांना सोडून भाच्यासोबत मुंबईला पळून गेली.


ही बाब धर्म चंद यांना समजताच त्याला मोठा धक्काच बसला. तो काळजीत पडला. काही दिवस एकटा आणि गप्प राहिला. मात्र काल रात्री म्हणजेच रविवारी रात्री धर्मचंदने आपल्या तीन मुलांना बोलावून घेतलं.


 त्यांना बिस्किटं खायला दिली. निष्पाप मुलांनी विचार न करता बिस्किटं खाल्ली. मात्र बिस्किटे खाल्ल्याबरोबर त्यांची प्रकृती ढासळू लागली. धर्म चंद याने बिस्किटांमध्ये विष मिसळले होतं.


स्वतः विष प्राशन केलं होतं. त्याला आपल्या मुलांची हत्या करून स्वतःचं जीवन संपवायचे होते. चौघांची प्रकृती ढासळू लागल्यावर त्यांनी ओरडण्यास सुरुवात केली. त्याचा आवाज ऐकून शेजारी आले. चौघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान धर्म चंदचा मृत्यू झाला. तर तिन्ही मुलांची प्रकृती चिंताजनक आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies