माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदनगर दौऱ्यावर आल्यानंतर विविध विकास कामांचे उद्घाटन केल्यानंतर त्यांनी शरद पवार यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. त्या टीकेला आता जयंत पाटील यांनी मोदींचाच एक व्हिडीओ पोस्ट करत उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
आम्ही खरी नियत ठेवून शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणासाठी काम करत आहोत. पण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या नावावर केवळ राजकारण केलं आहे. महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेते (शरद पवार) केंद्र सरकारमध्ये अनेक वर्षे कृषीमंत्री होते. व्यक्तिगत पातळीवर मी त्यांचा सन्मान करतो. पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? त्यांनी आपल्या सात वर्षांच्या कार्यकाळात देशातील शेतकऱ्यांकडून केवळ साडेतीन लाख कोटींचा शेतीमाल एमएसपीवर खरेदी केला. पण आमच्या सरकारने सात वर्षांत साडे तेरा लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले.
ते (शरद पवार) जेव्हा कृषीमंत्री होते, तेव्हा शेतकऱ्यांना स्वत:च्या पैशांसाठीही दलालांच्या भरवशावर राहावं लागत होतं. अनेक महिने शेतकऱ्यांना पैसे मिळत नव्हते. आमच्या सरकारने एमएसपीचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली,” असंही नरेंद्र मोदींनी नमूद केलं. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यावर जयंत पाटील यांनी मोदी यांचाच एक व्हिडीओ पोस्ट केला आणि प्रत्युत्तर दिलं आहे.
जयंत पाटील यांनी मोदी यांचा पोस्ट केलेला व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा.