माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : गोपीचंद पडळकर यांचा दसरा मेळावा सांगलीच्या आरेवाडीत पार पडला. यावेळी त्यांनी शरद पवारांवर पुन्हा एकदा घणाघाती टीका केली. तसेच धनगर आरक्षणाचा प्रश्न शेवटच्या टप्यात आला असल्याचेही सांगितले. धनगर समाजामध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र होत असल्याचा आरोपही त्यांनी करत त्यांनी म्हणून लबाड लांडग्यांच्या पिलावळीनी विष पेरायला सुरुवात केली असल्याचे सांगत त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्या बरोबरच संपूर्ण पवार कुटुंबियाचा समाचार घेतला.
यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, "धनगर समाजाच्या आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे. न्यायालयामधील धनगर आरक्षणासंदर्भातील सुनावणी अंतिम टप्प्यात आली असून आरक्षणाचा निकाल आपल्या बाजूनेच लागेल" असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
धनगर समाजाच्या आरक्षणाची लढाई आपण न्यायालयात लढत आहोत, 8 डिसेंबर , 11 डिसेंबर आणि 15 डिसेंबर या तीन तारखा न्यायालयाने धनगर आरक्षणाच्या अंतिम सुनावणीसाठी दिलेल्या आहेत. त्यानंतर धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर न्यायालय निकाल देणार आहे", असे गोपीचंद पडळकर म्हणाले.
🪀 WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन 'माणदेश एक्सप्रेस' Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा