माणदेश एक्सप्रेस न्यूज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील मानेवाडी येथील जकाई मंदिर परिसरामध्ये अवकाळी पावसाने व वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
आटपाडी तालुक्यातील मानेवाडी येथे निसर्गाच्या सानिध्यात प्रसिद्ध जकाई मंदिर आहे. या ठिकाणी दर तीन वर्षांनी मोठे यात्रा भरत असते. पावसाळ्यात या ठिकाणी अनेक छोटे-मोठे धबधबे निर्माण होत असल्याने या ठिकाणी तालुक्यातील अनेक पर्यटक हजेरी लावत असतात.
दिनांक २८ व २९ रोजी आटपाडी तालुक्यातील अनेक गावामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये मानेवाडी येथील जकाईदरा येथे असलेल्या जकाई मंदिर परिसरातील कठडे, मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या याचे मोठे नुकसान झाले आहे. तर मंदिर परिसरातील पत्रे देखील उडून गेले आहेत. त्यामुळे जकाई मंदिर परिसरातील या झालेल्या नुकसानीबाबत तात्कळ दुरुस्ती करावी अशी मागणी भाविकामधुन होत आहे.