माणदेश एक्सप्रेस न्युज : जालना : मराठा आरक्षणासाठी सुरु असलेले मनोज जरांगे-पाटील यांनी त्यांचे आमरण उपोषण मागे घेतले असून आरक्षणासाठी सरकारला 2 जानेवारी पर्यत तारीख दिली आहे. परंतु उपोषण जरी मागे घेतली असले तरी, गावा-गावामध्ये सुरु असलेले साखळी उपोषण मात्र त्यांनी सुरूच ठेवावीत असे आवाहन समज बांधवाना केले आहे.
सरकारच्या शिष्टमंडळाने आंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर प्रदीर्घ चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्याची भूमिका घेतली. आता दिलेला वेळ हा शेवटचा आहे. त्यामुळे वेळ घ्या पण आता आरक्षण द्या, असं मनोज जरांगेंनी यावेळी म्हटलं. तसेच आता पुढच्या लढाईसाठी तयार राहण्याचे आवाहन देखील मनोज जरांगे यांनी केले आहे.
वेळ वाढवून देण्यास जरांगे पाटलांचा नकार
२४ डिसेंबरनंतर सरकारला एकही दिवस वाढवून न देण्यास जरांगे पाटलांनी विरोध केलाय. सरकारच्या शिष्टमंडळाने २ जानेवारीपर्यंत वेळ देण्याची विनंती मनोज जरांगे यांना केली. पण जरांगे पाटील २४ डिसेंबर या तारखेवर ठाम राहिले. त्यानंतर तारखेबाबत बराच वेळ चर्चा देखील करण्यात आली. अखेर त्यांनी दोन महिन्यांची मुदत देत असल्याचं म्हटलं आहे. तसंच २ जानेवारीनंतर मुंबईचं नाक बंद करु असा इशारा दिला आहे.
सरकारकडून गेलेल्या शिष्टमंडळाला मोठं यश
२५ ऑक्टोबरपासून सुरु असलेलं जरांगे पाटलांचं उपोषण त्यांनी अखेर मागे घेतलं. दरम्यान त्यांनी सरकारला दोन महिन्यांची मुदत देखील यावेळी दिली. सरकारला मुदत देण्याच्या कालावधी वरुन प्रदीर्घ काळ चर्चा सुरु होती. पण जरांगे पाटील हे त्यांच्या भूमिकेवरही ठाम होते.
विशेष अधिवेशन बोलवण्याची तयारी
मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ जालन्यात गेलं. त्यावेळी शिष्टमंडळाने या प्रश्नी घाई गडबड न करता टिकणारं आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं सांगितलं. तसेच मराठा आरक्षणाच्या प्रश्नी ८ डिसेंबर रोजी विशेष अधिवेशन घेणार असल्याचंही आश्वासन दिले आहे.
🪀 WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन 'माणदेश एक्सप्रेस' Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा