माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : राज्यातील धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गामध्ये सामील करून त्यांना एस.टी. चे आरक्षण अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी राज्यातील धनगर समाज बांधवांनी उद्या दिनांक २१ रोजी तालुक्यातील तहसीलदार कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी निवेदने द्यावीत असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.
यावेळी बोलताना आमदार पडळकर म्हणाले, सरकारला आपली भूमिका कळावी, सरकारला आपला आवाज जावा, कारण धनगर आरक्षणा बाबत सरकारने पन्नास दिवसांचा दिलेला टाईम संपला आहे. त्यामुळे राज्यात लोकशाही मार्गाने धनगर समाज बांधवांनी आंदोलन करावीत. कारण सरकारकडून ठोस भूमिका होणे अपेक्षित आहे.
मी स्वत: मुंबई जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी उपस्थित राहून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे. त्यामुळे राज्यातील समाज बांधवांनी आपापल्या तालुक्यातील तहसीलदार कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी निवेदने द्यावीत.
गोपीचंद पडळकर यांचा व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा.