माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात लोकसभेसाठी मतदान सुरू असून सकाळच्या सत्रात खानापूर मतदारसंघांमध्ये 5.23% मतदान झाले होते.
परंतु तालुक्यातील शेंडगेवाडी गावाने मात्र गावाला मतदानावर बहिष्कार टाकला आहे. शेंडगेवाडी गाव हे पुर्वी आटपाडी ग्रामपंचायतीचा भाग होता. आटपाडी ग्रामपंचायतीचे नगरपंचायत मध्ये रूपांतर झाल्यानंतर शेंडगेवाडी गाव स्वतंत्र महसुली गाव म्हणून प्रशासनाने घोषित केले. तर दाखले उतारे व इतर सेवा देण्यासाठी बनपुरी ग्रामपंचायतला आदेश देण्यात आले होत. गेले होते.
परंतु यातील कोणतीही अंमलबजावणी झाली नसल्याने शेंडगेवाडी येथील ग्रामस्थांनी एकत्र येत लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे.
शेंडगेवाडी स्वतंत्र ग्रामपंचायत झाली पाहिजे यासाठी बहिष्कार घातला गेला असून, जो पर्यंत ग्रामपंचायत होत नाही, तोपर्यंत येणाऱ्या सर्व निवडणुकीवर बहिष्कार घालणार असल्याचे येथील ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे.