महाराष्ट्रातील धनगर समाजाला राज्य शासनाने आरक्षणा बाबत दिलेली मुदत संपली आहे. आता धनगर समाजाच्या संविधानिक मार्गाने चालणाऱ्या तीव्र लढ्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.
पडळकर यांच्या आवाहनानुसार आरक्षणाचा लढा तीव्र करण्यापूर्वी आज (दि.२१) राज्यातील तहसीलदर, प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना धनगर समाजाने निवेदन दिले.आमदार गोपीचंद पडळकर यांनी समाज बांधवा सोबत मुंबई जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.