संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच पुन्हा एकदा इंद्रायणी नदी फेसाळली आहे.
नदीमध्ये रसायनयुक्त पाणी सोडलं गेल्याने हे प्रदूषण होत असल्याचा आरोप आळंदीकरांनी केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये इंद्रायणी नदीमध्ये वारंवार रसयानुक्त फेस येत असल्याचं दिसून येत आहेत.
येत्या नऊ डिसेंबरला आळंदीमध्ये कार्तिकी वारी सोहळा होणार आहे. तर अकरा डिसेंबरला ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी आळंदीमध्ये दाखल होतात. या वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीच्या प्रदूषणामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.