माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : माणदेशातील ज्येष्ठ साहित्यिक, संशोधक प्रा. विश्वनाथ जाधव सर यांचे आज मंगळवार दि.२६ डिसेंबर रोजी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
प्रा. विश्वनाथ जाधव हे शिवाजी विद्यापीठातील १९७३ सालचे इंग्रजी विषयाचे गोल्ड मेडलिस्ट होते. त्यांनी श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आटपाडी या ठिकाणी आपली सेवा बजावली. इंग्रजी विषयावर प्रभुत्व असलेले प्राध्यापक जाधव सर अत्यंत हुशार सेवानिष्ठ आणि खडक शिस्तीचे होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी जवळपास पंधरा पुस्तकाचे लेखन आणि संपादन केले आहे.
माणदेशावर संशोधनात्मक "माणमुद्रा" हा त्यांचा गाजलेला संदर्भ ग्रंथ आहे , तर "वळणवाटा" हे त्यांचे आत्मचरित्रात्मक पुस्तक खूपच प्रसिद्ध आहे. लिखाणा व्यतिरिक्त प्राध्यापक जाधव यांना शेतीची अत्यंत आवड होती. त्यांनी शेतीत अनेक नवनवीन प्रयोग केले आहेत. व्हर्टिकल फार्मिंग चा प्रयोग त्यांनी आपल्या शेतात केला होता. ते आटपाडी येथील प्रसिद्ध वकील चेतन जाधव यांचे ते वडील होते.