Type Here to Get Search Results !

जयंत पाटलांची प्रतिक्रिया ; "निवडणूक आयोगाचा निकाल अनपेक्षित होता, कारण...



माणदेश एक्सप्रेस न्युज : सोलापूर : केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याचे उपमुख्यमंत्री  अजित पवार  यांच्या गटाला राष्ट्रवादी आणि घड्याळ चिन्ह बहाल केलं आहे. विधिमंडळातील बहुमतच्या जोरावर निवडणूक आयोगानं अजित पवार यांच्या गटाला पक्ष आणि चिन्ह सोपावलं आहे. यामुळे शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. या निर्णयावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.


टेंभूर्णीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील  म्हणाले, "निवडणूक आयोगासमोर अनेक तारखा झाल्या. या सुनावणीत सिद्ध केलं होतं की महाराष्ट्र आणि देशातील पदाधिकाऱ्यांचं बहुमत शरद पवारांच्या बाजूनं आहे. निवडणूक आयोगाला हे मान्यही झालं होतं. शरद पवारांनी हा पक्ष स्थापन करून महाराष्ट्र आणि देशात पक्षाचा विस्तार केला. २८ राज्यांत पक्ष आहे. त्यातील २३ राज्यातील प्रदेशाध्यक्षांनी शरद पवारांना पाठिंबा दिला.


"फक्त महाराष्ट्र विधिमंडळ सदस्यांच्या बहुमतावर निवडणूक आयोगानं हा निर्णय दिला आहे. सुभाष देसाई प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की, 'विधिमंडळच्या बहुमतावर पक्षाच निर्णय देणं आवश्यक नाही.' पण, पदाधिकारी शरद पवारांबरोबर असल्याचं सांगूनही हा निर्णय झाला आहे. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागू," असं जयंत पाटलांनी म्हटलं.


 



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies