Type Here to Get Search Results !

टेंभू कालव्या लगतच्या दोन्ही काठापासून 200 मीटर अंतरावर मनाई आदेश जारी



माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली :  टेंभू कालव्याव्दारे सांगली जिल्ह्याकरीता उन्हाळी हंगामातील सिंचन आवर्तन दि. 30 मार्च 2024 पासून चालू आहे. टेंभू कालव्याचे उन्हाळी आवर्तन सुरळीतपणे पार पाडण्याकरिता व सर्व लाभधारकांना सम प्रमाणात पाणी वाटप होण्याकरिता जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त अधिकारानुसार मनाई आदेश जारी केला आहे.


सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील 43 गावे, आटपाडी तालुक्यातील 60 गावे, कवठेमहांकाळ तालुक्यातील 34 गावे  व जत तालुक्यातील 45  गावांमध्ये कालव्या लगतच्या दोन्ही काठापासून 200 मीटर अंतरावर दि. 11 एप्रिल रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते दिनांक 31 मे 2024 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी फिरण्यास तसेच एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे. हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies